Friday, June 7, 2013

Farmville

8th june 2013
Farm ville राजू चा आवडता Facebook game.
सगळं खोट असतं . पण ख-याचा आभास असतो.

आज तिची वाट पाहत तो खूप वेळ उभा होता … एक सिगारेट लाईट केली ….
mobile चेक केला ….

"राजू "  सीमा चा आवाज …. राजू सिगारेट विझवून सीमाशी बोलायला लागला …

इकडे रिक्षा मिळत नाहीय म्हणून ती खूप अस्वस्थ … अचानक मेसेज टोन वजतो.
"today  nt possible... can v meet tmmrw... plz... urgent meeting aahe"

chating च्या  tone ने राजू भानावर येतो ….
"खरंच  बरोबर होत का जे मी वागलो ते.? कि त्या वयात असं असतच ?
पण आजच का हे सगळ आठवतंय … मी नाही तिला  फसवल …. माझा हेतू हि नव्हता तसा कधी हि
त्यादिवशी ती वेळेत आली असती तर कदाचित मला सीमा भेटलीच नसती ना !!! 

ती आज हि मला miss  करते खूप … पण मला येते का तिची आठवण …????

मला तिच्यात काय आवडल हे नाही माहित …. पण प्रेम होत तिच्यावर     खूप प्रेम होत…
मीच  तिला माझ्या पासून दूर जायला  लावल…
'अरे माझ्या सोबत लग्न केल असत तर तिला खूप त्रास सहन करावा लागला असता …
मीच अजून सेटल नाहीय … म्हणून मी तिच्यासाठी  हा निर्णय घेतला '   असं  खोटं  सांगताना मला कधीही गिल्टी फील झालं नाही ….

सीमा बरोबरच्या १० मिनिटांचा मोह आवरला असता तर……. "

राजू computer वरून उठला … farm ville  चालूच होत… आज तर तो पिकांना पाणीही द्यायला विसरला …
डोक्यावर भूक लागल्याचे symbol घेवून प्राणी फिरत होते.

कोणाच्या मनात काय आहे हे त्या व्यक्ती कडे बघून कळल असत तर?  प्रत्येकाच्या डोक्यावर देवाने एक symbol दिला असता तर?
 ज्यात ज्या ज्या वेळेला त्या व्यक्तीला काय वाटतंय त्याच्या काय अपेक्षा आहेत हे कळल असत
खूप सोप्प झाल असत आयुष्य …. कुणी रागवलही नसत ना मग …
तुला माझ्या मनातल कळतच नाही
एवढ कस रे नाही कळत तुला … ठोम्ब्या कुठचा
समझ न यार बस क्या …

अरे नाही कळत मला कुणाच्या मनात काय आहे ते … नाही वाचता येत मला चेहरा …
डोळ्यात बघून मनातल नाही ओळखता येत मला … मौनाची भाषा तर मुळीच काळत नाही …
leave me alone "

बाल्कनीतून खाली अंधारा रस्ता … ठराविक अंतराने महापालिकेच्या दिव्यांचा पडलेला गोलसर कवडसा (actually उजेड )
एखादी bike , एखादी rickshaw , उशिरा कामावरून परतणारे …. सगरेटी फुंकत जाणारा एक group

"मी तिचा हात हात घेतल्यावर काय छान लाजली होती … खरतर मी हि आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीचा हात पकडला होता ,,,
बराच वेळ शांततेत गेला …. घरी जातानाही आम्ही एक ठराविक अंतर ठेवून चालायचो ….
सुंदर होते ते दिवस………  पण ते असेच सुंदर राहिले असते का ?
मी प्रेमाने धरलेला तिचा  हात आता मला जबाबदारी म्हणून धरावा  लागला असता का?
तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला तिच्या पासून लांब रहाव लागल असत का?
आता ती माझ्या आयुष्यात नाही … मला नाही वाईट वाटत आता …
पण तरीही तिला पाहिल कि, तिच नुसत नाव ऐकल कि छाती फुटेल इतक का धडधडत?"

farmville चे प्राणी उपाशीच होते ,,, राजू ने computer बंद केला तरी तरी ते तसेच राहणार
"खोट जग असत ते .... पण ख-या जगाच काय …. ख-या माणसांच काय
त्यांच मन खर असतं , त्यातल्या भावना ख-या असतात , त्यात स्वार्थ नसतो …
मग relationship अशी बंद करता येते? computer सारखी …
बंद करता हि येईल पण पुन्हा चालू कशी करणार …"
ढगांच्या पडद्याआडून चांदोमामा सगळ पहात होता ….
पण राजू ने डोळ्यावर कसला पडदा चढवला होता कुणास ठावूक ….


- जयंत पवार


1 comment: