Friday, June 7, 2013

सन १८५७ चा उठाव …. शाळेत शिकवला होता … अलीकडच्या काळात आमिर खान ने आठवण करून दिली .
गाई व डुकराच्या चरबीचे आवरण असलेली काडतुसे
धर्म भ्रष्ट होईल म्ह्नणून बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४व्या बी. एन. आय तुकडीच्या सैनिकांनी काडतुसे वापरायला दिलेला नकार
अन्याय विरुद्ध मंगल पांडे ने केलेला उठाव ……

अगदी सहज नाही आठवलं … आणि सहज सुचलही नाही … आणि तितका गांभिर्याने विचार करण्यासारखं हि काही नाही ….
हा भारताचा भूतकाळ होता…. वर्तमान काळ तर बघतोच आहे आपण …
आत्ताच्या काळात मंगल पांड्येला च आपण वेड्यात काढू
जसा अण्णांच्या आंदोलनाला आपण उस्फुर्त पाठींबा दिला… सगळ्यांनीच… वा !!!! क्या बात है … पण पुढे काय झालं ? ते एकटेच पडलेत...
असो या विषयावर जास्त नाही बोलत मी ( प्रत्येकाची वेगळी मतं असू शकतात. )
तर काय म्हणत होतो मी ..... हं .. आठवलं … ( सामान्य माणूस आहे हो मी कोणतीही गोष्ट खूप लवकर आणि खूप सहजतेने विसरण्याचं कसब अंगिकरलय मी सुद्धा )

सन २०____ चा उठाव .. (साल कोणतं ते आपण सगळे ठरवूया )
भ्रष्टाचार आणि गलथान कारभाराचं आवरण असलेलं सरकार .. ( सरकार मध्ये नसलेले राजकारणी सुद्धा तसेच असतात हे सुज्ञास सांगायला नको )
देश बुडेल ( almost बुडलाच आहे ) म्हणून भारतातील तरुणांनी सरकार विरुद्ध आणि system विरुद्ध केलेला उठाव , पुकारलेलं बंड. बंद नाही हं … बंड .. बंद तर कोणीही उपटसुंभ करू शकतात या देशात .. त्यासाठी धैर्य लागत नाही.. देशप्रेम वैगेरे तर मुळीच लागत नाही .. पण बंड करणं सोप्प नाही … त्यासाठी बरंच पाणी पुलाखालून जावं लागतं .....
(sorry पाण्याचा उल्लेख अनावधानाने आला ... पाणी प्यायल्यावर सु सु पण लागते )

लोक अन्याय विरुद्ध बोलायला लागलेत ...
खोट्या आश्वासनांना बळी पडत नाहीत हल्ली ...
भ्रष्ट लोकांच्या कॉलरला धरून त्यांना त्यांचा पोस्ट वरून खेचून काढतायत.....
कोर्टाचे निकाल सरकारच्या बाजूने नाही तर न्यायाच्या बाजूने लागतायत ….
भारताची खऱ्या लोकशाही च्या दिशेने वाटचाल ...
फक्त जातीच्या आधारावर कोणालाही कोणतीही नोकरी न देता शिक्षणाच्या आधारावर दिली जावी याबद्दल तरुणांची आग्रही भूमिका ... समान नागरी कायदा व्हायलाच हवा हा देखील आंदोलानातील एक महत्वाचा मुद्दा....
सरपंच , नगरसेवक यापासून ते खासदारा पर्यंत सगळ्यांना सामाजिक भान , किमान पदवी शिक्षण या basic गोष्टी गरजेच्या ….

जावू दे मलाच काळात नाहीय मी काय बोलतोय आणि का बोलतोय ? साधा वाक्यांचा क्रम हि निट लावता येत नाहीय मला … कोणते मुद्दे मांडायचे आहेत याचाही गोंधळ उडालाय माझ्या मनात …
पण एक मात्र नक्की कि मी अस्वस्थ आहे ...
खुप अस्वस्थ
आताशा कोणाची भीती हि वाटेनाशी झालीय ..
किती दिवस भ्यायचं ?
साहेबांच्या गाडीची पार्किंग ची जागा आहे तुम्ही इथे पार्क नाही करायच … अरे रस्ता काय तुमच्या बापाचा आहे …
हेल्मेट घातला नाही कि दंड भरा… पोलिसांना हा नियम लागू नाही .. त्यांच्या सन्माननीय पिताश्रीनी कायदा बनवला आहे बहुतेक
या आणि अशा खूप गोष्टी आहेत
तुमच्या हि मनात असतील
share करूयात का ?
मनातलं कोणाशी तरी बोलला कि हलकं वाटतं असं म्हणतात .. आपण तसेही उपरे आहोत या देशात .. चला एकमेकांना सोबत करूया
मनातली खद्खद share करूया .


JAYANT PAWAR

2 comments: