Friday, June 14, 2013

15th june 2013


बायकोने आज छान चिकन केलं होतं जेवायला
पण मीठ कमी पडलं .

"मीठ कमी आहे…  मीठ दे "  राजू ची order

बायकोने मीठ आणून दिलं … मीठ टाकताच चिकनला त्याची स्वत:ची अशी चव आली ….

"मीठ सुयोग्य प्रमाणात असतं तर मला मिठाची आठवण आली असती का?

जेवणात मीठ असतं तेंव्हा ते आहे याची आठवणही होत नाही … ते नसतं तेंव्हा त्याचं नसलेपण जाणवतं ….

मिठाला स्वतंत्र अस्तित्व नसतच मुळी … मीठ खारट असतं … जेवणात मिसळल्यावर ते जेवणाची चव वाढवतं ….

काही माणसं अशीच असतात का मिठासारखी …. ??? "


राजू बेडरूम मध्ये येरझा-या घालत होता …

"आयुष्यात सगळे असतानाही आपण एकटेच आहोत … "

…. मनातली सल … 

…. येरझा-या चालूच होत्या …

"का नाही मी कोणासाठी महत्वाचा … ?
का माझ्या मित्रांना मी महत्वाचा वाटत नाही … ?
का माझ्या रक्ताच्या नात्याला माझं महत्व कळत नाही … ?
तिला तर मी नसतानाच माझी आठवण जास्त येत होती … सोबत असायचो  तेंव्हा मात्र ती तशी नाही वागली कधीही  …. का ?


पण हीच मात्र तसं नाही … मी सोबत असतानाही हि  मला खूप miss करते …
पण तसं दाखवत मात्र नाही …
माझ्या मनातलं दु:ख ती ओठांनी अलगद टिपून घेते …
माझ्या डोळ्यात बघून तिला माझ्या मनातली सल कळते …. केसांमधून हात फ़िरवते…
काळजी घेते खूप … "


राजू बेड वर डोळे मिटून शांत पडला होता … पण झोपला मात्र नव्हता …
"हि  आली …माझा संसार नेटका व्हावा म्हणून दिवसभर राबून हि  आली … अंगावर पांघरून घातलं  … आणि शांत झोपली … "

राजू जागाच होता … बायकोकडे पाहत होता … पाहण्याचा प्रयत्न करत होता … पहिल्यांदा ….

" खरंच  मीठ कोण आहे? "
"मी कि हि ?"


- जयंत पवार

2 comments: